{अश्वथामा एक चिरंजिवी ! मृत्यूचे त्याला भय नव्हते. मात्र महाभारतातील एका भयंकर चुकीमुळे, त्याच्या कपाळावरचा जन्मजात दिव्य मणी उपसून काढला गेला. अन तिथे राहिली एक न सुकणारी जखम ! ही डोक्यावरची भळभळणारी जखम घेऊन हा चिरंजिवी अजूनही फिरतो आहे.
आपला समाज एक सनातन समाज - ज्याला आदि नाही, ज्याला अंत नाही ! एका अर्थाने चिरंजिवी ! आपल्याही कपाळावर एक दिव्य मणी आहे, संयमाचा !
खूप दिवसांनी असा चित्रपट पाहिला ज्याबद्दल खूप लोकांना खूप (वेगवेगळी) मतं आहेत. ज्यांना आवडला त्यांना प्रचंड आवडलाय.. ज्यांना नाही ते शिव्या घालतायत. तुमचं काय मत आहे?