पूल

तुला कळलं असेलच म्हणा,
कालच्या वादळी पावसात
आपल्या गावांना जोडणारा
पूलच मोडून गेला

तसं गाव नेहमीच्या
कामकाजात व्यग्र आहे;
पूल तुटल्याने काय ते
दळण्वळण फक्त बंद आहे

तसही स्वयंपूर्ण असल्याची
भावना इतकी तीव्र आहे
की आता दोन्हीकडून
परत पूल बांधायचे
प्रयत्नही होण कठीण आहे

हे देखील तुला कळलं असेलच म्हणा..

कविता: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle