अज्या: भावा, आज संध्याकाळी सयाजीला येणार काय? पलोमा तिच्या त्या मित्राला भेटायला जातेय आणि त्याच्यासोबत त्याचे पंटर आहेत. जाईजुई तिला सोबत म्हणून जातायत तर कार्तिकी म्हणे आपण पण जाऊ. तू चल, अजून आपली एक दोन पोरं पण बोलवू.
मी: यायलाच लागतंय भावा! :D
मी टेक्स्टला उत्तर दिलं.
हा चान्स मी काही झालं तरी सोडणार नव्हतो.
तिने मला बनवलं की काय? ती अजून रिलेशनशिपमध्ये असेल तर.. मी नक्कीच शोधून काढणार आहे.
मी घरी जाऊन आंघोळ करेपर्यंत अज्याचे दोन कॉल येऊन गेले. शेवटी मी कपडे घालून केस जेमतेम पुसले आणि तसाच पलोमाच्या घराकडे निघालो. तिने दार उघडताच मी शिट्टी वाजवली! तिने कत्थई रंगाचा स्लीवलेस काऊल नेक टॉप आणि ब्लॅक ट्रावझर्स घातल्या होत्या. नेहमीचे सरळसोट केस आता सॉफ्ट कर्ल केले होते. कानात कसल्यातरी स्टोनचे ड्रॉप इयरींग. मी तिच्या मागोमाग किचनमध्ये गेलो. जाईजुई तिथे हसत उभ्याच होत्या.
"मला चालता येतं, माहिती आहे ना?" तिने माझ्या पाठीत धपाटा घातला. ऑss मी ओरडलो.
"माहिताय की! सकाळीच मला धापा टाकेपर्यंत पळवलंस तू." मी तिला खांद्यावर घेऊन दारातून आत आलो आणि पायाने दरवाजा लोटला. समोरच ओपन किचनच्या भल्यामोठ्या डायनिंग टेबलवर तिला बसवलं आणि तिच्या गळ्यात हात टाकून मी उभा राहिलो. तिचा दमून लालसर झालेला चेहरा चकाकत होता, विस्कटलेल्या सेक्सी केसांच्या लाटा खांद्यावर पसरल्या होत्या. वितळत्या चॉकलेटसारख्या डोळ्यांमधले भाव स्पष्ट दिसत होते आणि ओठ विलग झाले होते. "तू मला खांद्यावर उचलून पळत आलास!!" ती किंचित हसत म्हणाली.
"मला आपल्यात वाढणाऱ्या अंतराची भीती होती. आपण वेगवेगळ्या वाटेवर निघालो होतो आणि तेव्हाच घोरपडे तुझ्या सिलेक्शनसाठी आले होते. आठवतंय? त्यांनी सिलेक्शन झाल्यावर तुला आणि आईबाबांना जेवायला बाहेर नेलं होतं, बहुतेक वूड हाऊसला, हो ना? आणि तू हट्टाने मलाही घेऊन गेला होतास. ते तुझ्या खेळाच्या, बोलिंग स्टाइलच्या जाम प्रेमात होते. खूप कौतुक करत होते." ती हसऱ्या चेहऱ्याने म्हणाली आणि खांद्यावरून डोकं उचलून जरा लांब झाली. जवळीक अती होत असल्यासारखी.
"आठवतंय, तो खूप आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी. आणि दुसराच दिवस त्याच्या विरुद्ध होता कारण तू कसलीही कल्पना न देता, अचानक मला सोडून गेलीस."
"ग्रेट वर्कआऊट, समर! घोरपडे कबसे मेरे पीछे पडा है, समरका कैसा चल रहा करके.. रुकता ही नही है." वेंडी धपकन खुर्चीत बसत म्हणाला. मी बाटली संपेपर्यंत घटाघट थंड पाणी प्यायलो. आज खूप गर्मी होती आणि मी रागाने स्वतःला खूप जास्त पुश केलं होतं.
मी अजूनही पलोमावर चिडलो होतो. कालची रात्र आणि त्यानंतर आम्ही इतकं बोललो तरीही ती माझ्यापासून पळतच होती. हे मला अजिबात मान्य नव्हतं. आणि घोरपडेचा नुसता उल्लेख ऐकून रक्त उसळत होतं.
श्री. अशोक जैन ह्यांनी १९७८ च्या ऑगस्ट ते १९८९ ह्या अकरा वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्स ह्या मराठी वृत्तपत्राचा दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. दिल्लीत असलेल्या विशेष प्रतिनिधीने तिथल्या राजकारणावर, सत्ता मिळवण्याच्या आणि गमावण्याच्या चक्रावर नजर ठेवून आपल्या वाचकांपर्यंत त्या बातम्या पोचवणे, हे अपेक्षित होतंच. त्या व्यतिरिक्त दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्समध्ये दिल्लीतील घडामोडी सांगणारं ‘राजधानीतून’ हे सदर जैन लिहीत असत.