हरितक्रांती

वृक्षारोपण आणि आपण

फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.

कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?

समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?

Keywords: 

लेख: 

Subscribe to हरितक्रांती
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle