भारताला अत्यंत संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठेव्याच्या खाणाखुणाही भारतभर अनेक रुपांत विखुरल्या आहेत. त्यातीलच एक रत्नं म्हणजे ऐतिहासिक वास्तू. गड, किल्ले, राजवाडे, वाडे , गढ्या अशा विविध स्वरुपात हा वैभवशाली गतकाळ आपल्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारी अनास्था आणि जनतेची उदासिनता यामुळे हे अवशेष ढासळत जातात.
'कोबाल्ट ब्लू' मी काही वर्षांपूर्वी वाचलेलं आणि आवडलं होतं.
कथेतल्या एका मुख्य पात्राला नाव नसणं, पण त्याच्यामुळेच त्या दोन भावंडांनी आपल्या लैंगिकतेचा शोध घेणं रोचक वाटलं होतं. कॅटलिस्टसारखं मध्यवर्ती पात्र ही कल्पनाही वेगळी वाटली. (आता त्या भावंडांची नावं आठवत नाहीत पण) ती नावही शारीर अर्थ सुचवणारं. तिचं वर्णनही मस्त होतं, दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरल्यामुळे सुडौल बांधा आणि रापलेला वर्ण असं काहीसं.
'आनंद' या वेळचा विषय. आपला आनंद कशात आहे ते लिहायचं. आपल्या कलाकॄती, आनंदी आठवण असं काहीही. वाचूनच मस्त वाटलं आणि माझा आनंद कशात आहे हा प्रश्न स्वतःला विचारला. उत्तरं एकाहून अधिक येणार याची खात्री होतीच म्हणून चक्क पेन-पेपर घेऊन लिस्ट करायलाच घेतली.
एका दीडशे वर्ष जुन्या पण अजूनही ती शान तशीच राखलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या व्हरांड्यात बसून तुम्ही साग्रसंगीत चहा पित आहात. खानसाम्यानं तुमच्यासमोर आणून ठेवलीय टीकोजीनं झाकलेली किटली, नाजूक नक्षीदार कपबशा, पेस्ट्रीज आणि गरम स्नॅक्स...
(आशिकाने आम्ही आनंदे नाचू गाऊ या हा धागा काढला, तो वाटताना मला हा लेख आठवला. असं वाटलं इथल्या मैत्रिणींना आवडेल हा. म्हणून टाकतेय.)
आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.
आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.
ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं.
तर सकाळी सकाळी त्याला त्याच्या बहिणीचा का कोणाचा व्हॉटस अप आला वाटतं कारण त्याने घोषणा केली,
"१२ बरं का!"
"१२? काय १२ वाजले? एवढा वेळ झोपले मी आज?" तसा रविवार असल्याने घाई नव्हती पण १२?