साध्या शब्दांत सांगायचं तर, मशीनच्या बाबतीत मेंटेनन्स मोड म्हणजे नवीन काही तयार करणं, वेगाने धावणं, सतत सिद्ध करत राहणं थांबवणं.
नवीन अपडेट्स थांबवणं. फक्त आवश्यक तितकंच काम करणं. काही बिघाड झाला असेल तर तो तपासणं. जुन्या फाईल्स मेमरीतून काढून टाकणं आणि स्वतःला स्थिर कसं ठेवायचं हे पावलोपावली ठरवणं.
माणसाच्या आयुष्यातसुद्धा असा एक मेंटेनन्स मोड येणं गरजेचं असतं ....... आणि तो येतोच.
फिरत्या चाकांवर आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जातो त्याला आपण जनरली प्रवास म्हणतो. पण त्या व्यतिरिक्त हि आपल्या आयुष्यात काही प्रवास नकळतपणे घडत असतात.
आपल्या विचारांची बैठक अनुभवांनी बदलते. शरीरयष्टी बदलते. आपण कसे दिसावे या बद्दलचा प्रवास पण हळू हळू बदलत जातो.
काळ्याकडून पांढऱ्याकडे (केस) - हा एक खूप मोठा प्रवास आहे असं मला वाटतं. भल्या भल्यांना तो शिफ्ट मारताना त्यांची स्थिती दोलायमान होते.
तर, सोमवारची संध्याकाळ. दिवसभराच्या ऑफिसच्या कामाचा, ताणाचा क्षीण अंगात पसरलेला. काहीशा विष्ण्ण मनस्थितीतच टीव्ही चालु केला. घरात अंधार, मनात अंधार, विविध कारणांमुळे. प्राइमवर मनोज वाजपेयी दिसला. टायटल न वाचता, चित्रपट आहे का सिरीज आहे काही न बघता चालु केला. मनोज वाजपेयी असेल ते सर्व काही बिनधोक बघावे हा नेहमीचाच विचार.
मधमाशी हा किटक अखिल मानवजातीला लाभकारी आहे असे गेले कित्येक वर्षे ऐकत आहे. मधमाशी संपली तर चार वर्षात मानवही पृथ्वीवरुन संपेल असे एक वाक्य अल्बर्ट आईनस्टाईनच्या नावावर खपवले जाते. मला शेतीत रस असल्याने मधमाशीबद्दल आकर्षण होते पण ते सोडता बाकी काही माहिती नव्हती.
मधमाशीच्या घराची ओळख झाल्यावर आपण आता मधमाशीची ओळख करुन घेऊ. ही माहिती सर्व माश्यांना सारखीच लागू पडत असली तरी माश्यांचे आकार त्यांच्या प्रजातीनुसार लहान मोठे असतात. मधमाशीवरचे बहुतांश संशोधन अॅपिस मेलिफेरावर झालेले आहे. ही युरोपियन माशी आहे पण भारतातही आढळते. आपली भारतीय माशी अॅपिस सेरेना जिला महाराष्ट्रात सातेरी म्हटले जाते. ही मेलीफेरापेक्षा लहान आहे आणि तिच्यावर फारसे संशोधन अद्याप झालेले नाही. मधमाश्यांच्या प्रजातीबद्दल जास्तीची माहिती आपण नंतरच्या भागात घेऊया.
मधमाशीची शरीररचना आपण समजुन घेतली. आता मधमाशीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊया.
राणी, कामकरी व नर अशा तिन जातीच्या माशा पोळ्यात असतात. प्रत्येक पोळ्याची राणी एकच असते, नर दोन तिनशे असतात आणि कामकर्या हजारो असतात. एका निरोगी पोळ्यात साधारण विस हजार ते ऐंशी हजार मधमाशा असतात. बाहेर फुलोरा असतो म्हणजे मुबलक अन्न असते तेव्हा पोळ्यात मधमाश्या भरपुर असतात, बाहेर हिंवाळा किंवा पावसाळा असतो म्हणजे अन्न उपलब्ध नसते तेव्हा मधमाशांची संख्या रोडावते. पोळ्यात साठलेल्या मधावर गुजराण करायची तर जास्त लोकसंख्या असुन चालत नाही.
आज फ्रीजमध्ये अगदी पाव वाटी खवलेला नारळ उरला होता, त्याला मार्ग दाखवायचा म्हणून रिल्समध्ये दिसलेली वाटपाची डाळ आठवली. आमच्याकडे अशी डाळ कधीच करत नाहीत म्हणून वाईच insta खंगाळलां!
साहित्य:
कुकर साहित्य:
तूरडाळ: १ वाटी
मध्यम कांदा: अर्धा चिरून
मध्यम टोमॅटो: १ चिरून (कैरीच्या सीझनमध्ये टोमॅटो अर्धा आणि दोन तुकडे कैरी)
दोन हिरव्या मिरच्या: उभ्या चिरून (तिखट प्रेमींनी जास्त म्हणजे तीन चार घ्या)
अर्धा चमचा हळद
थोडे मीठ
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा....
कोणाला?
ज्यांना ल आणि ळ यातला फरक कळतो आणि ते स्वच्छ स्पष्ट म्हणता येतात त्यांना,
ज्यांना नळ आणि बाण म्हणणं बरोबर आहे हे पटतं त्यांना,
ज्यांना पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी चुकीची दिली कि डोळ्यात खुपते त्यांना,
ज्यांना श च्या जागी ष आणि ष च्या श लिहिलेला बरोबर करावा वाटतो त्यांना
आणि
ज्यांना "चा टाक" म्हणणं तितकंच बरोबर वाटतं जितकं "चहा ठेवतेस का" त्यांना,
ज्यांचं "बारं मग ठिऊ का" कानांना गोड वाटतं त्यांना,
ज्यांची "काय पावनं कुणीकडंनं आलायसा" अशी मनापासून आपुलकी असते त्यांना,