पुण्यात सध्या ऊन 'मी' म्हणत नाहीये तर हॉ हॉ हॉ असे भयानक राक्षसी हसत 'आम्ही' म्हणतंय! अक्षरशः होरपळून घरी आल्यावर गॅसजवळ काही करण्याची किंवा पोळी भाजी खाण्याचीही इच्छा होत नव्हती तेव्हा ही व्हायरल रेसिपी आठवली. केली आणि चक्क आवडली! थोडंच साहित्य असल्याने अगदी पटकन होते.
साहित्यः
दही - २ वाट्या (आमटीची वाटी)
उकडलेले बटाटे - मोठे दोन
कांदा - मोठा १
कोथिंबीर - मुठभर चिरलेली
एकेक टी स्पूनः लाल मिरची पूड, जिरेपूड, आमचूर पावडर,
मीठ चवीनुसार
कालपासून फोटो टाकू की नको, टाकू की नको विचार करत होते. शेवटी मोह काही आवरेना, म्हटलं टाकावेच.
सध्या मुंबईचं अगदी जयपूर झालं आहे म्हणजे काय तर गुलाबी झाली आहे. गुलाबी थंडी वगैरे वाटेल कोणाला पण तसं अजिबात नाही. यंदा अगदी उशिराने मुंबईत छोट्या रोहित पक्षांचं (Lesser Flamingo) आगमन झालंय. त्यांच्या दर्शनासाठी सगळे हौशे-नवशे—गवश्यांची गर्दी झाली आहे.
चॅप्टर १ : स्ट्रेन्जर इन माय हाउस
साधारण १९९९-२००० च्या आसपास राम गोपाल वर्मा-उर्मिला मातोंडकर-मनोज वाजपेयी या जबराट कॉकटेलचा अत्यंत स्केअरी थ्रिलर मुव्ही आला होता, ‘कौन’ !
एका रात्री उर्मिलाच्या घरात एक स्ट्रेन्जर घुसतो आणि सुरु होतो एक लपाछपीचा ट्विस्टस ने भरलेला थरार.. नक्की कोण कोणाला थ्रेट आहे, कोण कोणाला घाबरतय..प्रेक्षक पार कनफ्युज होतात !
तसाच काहीसा थरार गेल्या शुक्रवारी आम्ही अनुभवला !
२२ मे २०२६
मेमोरिअल डे लाँग विकेन्ड असल्यामुळे शुक्रवार दुपार पासूनच सगळीकडे सुट्टीचं वातावरण होतं !
काही गाणी अशी असतात की ती मनात निवांतपणे घर करून राहतात; पण त्यांचे खरे अर्थ मात्र काळाच्या ओघात, अनुभवांच्या साठ्याने आणि वयाच्या परिपक्वतेने हळूहळू उलगडत जातात. “बरसात की रात” मधली ही कव्वाली त्यातलीच एक.
लहानपणी बाबा जेव्हा हे गाणं लावायचे, तेव्हा मनात फक्त एकच विचार यायचा तो म्हणजे “कायच्या काय मोठ्ठं गाणं आहे!” ते ऐकण्याचाही कंटाळा यायचा. त्या वेळेस त्यातलं गूढ, त्याची खोली किंवा त्याचा आत्मा काहीच स्पर्शून जात नव्हता. मनात उमटणारा एकच शब्द “रटाळ!”