तू जेव्हा श्रावण बनून आला,
पाचूचा सागर होता उसळला
तू बनून येता बहर पारिजातकाचा,
देहच झाला माझा, फाया अत्तराचा.
तू बनून येता माझा बसंत,
श्वासांनाही ना मिळे जरा उसंत.
तू शिशिर बनुनी आला,
झाले आयुष्यच पाला पाचोळा...
मौनच उरले जरी आता अंगणी,
देह अडकुन आहे, अजून मोहाच्या रिंगणी...
जेव्हा वयाची पंच्याहत्तरी येते —२
**************************
चक्क काहीतरी लिहावे वाटतय
म्हणजे मी म्हातारा झालोय?
अवघे पंच्चाहत्तरावेच तर सरतेय
किती ही कलकल?मीच गप्प बसतोय....
सूनेने उशीर झाला समजून दिला चहा
मुलाने हातातले वर्तमानपत्र ठेवलं समोर
सौ ने माझ्या कपाळाला लावला हात
तोंडाने बडबड,वैताग,जीवाला घोर....
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत...
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.
रुपाली..श्रद्धा.. आणि
उजेडात न आलेली सावजं किती तरी
आईवडिलांशी भांडून घर सोडलेल्या, पळून गेलेल्या किती तरी
इतक्या भाळल्या? कशाला भुलल्या?
जिवावर अशा कशा उदार झाल्या?
रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.
आपला परिसर परका होतो.
सगळं माहितीचं.
ओळखीचं काहीच नाही,
कुणीच नाही.
ही सुरुवात असते बाजूला पडण्याची, तुटण्याची.
आधी जागा नाकारते.
मग माणसे नाकारतात.
मग परिसर नाकारतो.
मी अगतिक.
धुंडाळते जुन्या जगाचे जुने कोपरे.
माझा नाईलाज नेत राहतो मला जुन्या वाटांकडे.
आता इथे थारा नाही.
इमारती, माणसे, गाड्या
सगळ्या गर्दीने कधीच फेकून दिलेय मला.
आता शहरातल्या प्रत्येक क्षणी हे शहर मला नाकारते.
माझे त्याचे नाते नाकारते, ओळख नाकारते,
तात्पुरता आसराही नाकारते.
शहराने हे फार पटकन अंगवळणी पाडून घेतलेय.