ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.
नवरा गेलाय फिरतीवर, दुसर्या शहरात. घरात मी एकटीच. आता एकटीसाठी काय जेवायला करायचं? साधी खिचडी टाकावी म्हणून मी डाळ-तांदूळ धुऊन पातेलं गॅसवर ठेवून फोडणी केली. तितक्यात...
आशुतोषने सकाळचा चहा पित असतांना नेहमीच्या सवयीने मोबाईल हातात घेऊन मेसेजेस, व्हॉट्स अप चॅटस,एफ. बी. बघायला सुरुवात केली. काही वेळातच त्याच्या स्क्रीनवर व्हॉटस अप पॉप अप आले. अमित अॅडेड यू....अम्याने नवा ग्रुप का तयार केला? असा विचार करतच आशुतोष त्या ग्रुपवर पोचला. अमित अॅडेड निखिल,अमित अॅडेड कुणाल असे एकापाठोपाठ एक मेसेजेस वाचत असतांनाच नंतरच्या मेसेजने आशुतोषला हसूच आले.
अमित चेंज्ड ग्रुप नेम टू ‘लेडीज स्पेशल’.
“अम्या... सकाळी सकाळी टाकली काय रे पहिल्या धारेची?” आशुतोषने पोस्ट टाकली.
पाठोपाठ निखिलही “XXXX, चार मुलांच्या ग्रुपचे नाव लेडीज स्पेशल? :thinking:
माझं नाव नार्या - म्हणजे नारायण कांबळे पण नार्याच म्हणतात मला. शिक्षण - B.Com. तीन वेळा बसून नापास. सध्या क्लार्क आहे एका खाजगी कंपनीत. तर असा मी साधा-सुधा माणूस. पण गम्मत अशी आहे की सर्वांनाच मी साधा-सुधा नाही वाटत. पण लोकांचं काय, त्यांची आणि एखाद्याची मतं नाही जुळली की लगेच त्या माणसाला विचित्र ठरवून मोकळे! माझ्या शेजार्या-पाजार्यांनी , ऑफिसमधल्या सहकार्यांनी मला असच विचित्र माणूस ठरवलय. एवढच काय माझी आई सुध्दा कधी कधी माझ्या बोलण्यावर एकदम टीपं गाळते. म्हणते "देवा, कसं व्हायचं माझ्या या वेड्या लेकराचं?" आता मी काही वेडा आहे का? पण "जाऊ देत", मी म्हणतो.
सोनू अग भाज्या नको तर निदान कोशिंबीर तरी खा गं. काय ही तुझी खाण्याची नाटकं? रोज रोज किती सांगायचं तुला की कच्च्या भाज्या पण खाव्यात म्हणून.
आई प्लीज नको गं. मला नाही आवडत त्या भाज्या आणि कोशिंबीर. ती मुळमुळीत काकडी, ते कचकचणारं गाजर, तो काही कारण नसताना रडवणारा कांदा, तिखट मुळा, ते उग्र वासाच बीट आई ग्ग....
अग पण सगळं एकत्र केल्यावर आणि त्यात दही कूट घातल्यावर बघ कशी छान चव येते. अग एकदा खाऊन तर पाहशील?
नको गं आई प्लीज.
सकाळची आवरा-आवर करून सुवर्णा हाश-हुश करत स्वयंपाकघरातून बाहेर आली. ११ वाजत आलेले. घामाच्या नुस्त्या धारा लागलेल्या. बाल्कनीत जाऊन जरा निवांत ५ मिनीटं उभी राहिली ती. हे रोजचंच. उन्हाळा वाढत होता, घामाच्या धारा लागत होत्या. नुस्त्या पंख्याने काम भागतच नव्हतं. त्यातून सुधाकरचा तो नीटनेटकेपणाचा अट्टाहास! प्रत्येक गोष्ट न गोष्ट त्याला स्वच्छ - स्वच्छ कसली, चकचकीत आणि जागच्या जागी लागायची. त्यामुळे सकाळी नाश्ता आवरून तो कामावर गेला की मागून सगळी साफसफाई, झाडलोट, फरश्या पुसणे ह्यात तिचा वेळ जायचा. आणि लगेच परत स्वयंपाकाची तयारी! कारण दुपारी १ वाजता सुधाकर परत जेवायला घरी येऊन जायचा.
***मोगऱ्याचा गजरा***
तिला मोगऱ्याचा गजरा खूप आवडायचा ...
केसात माळला नाही तरी गाडीत, पर्समध्ये कुठे ना कुठे गजरा दरवळतच असायचा कायम ...तिच्या अवती भोवती...
आज तर काय डोहाळ जेवण होत तिचं ...
वेणी लगडली होतीच मोगऱ्याने... पण तिला आवडतो मोगरा म्हणून पूर्ण वाडीच मोगऱ्याची मागवली होती... खास तिच्यासाठी!
आज्जी कौतुकाने म्हणाली...
"घे हो माळून मोगरा... पुन्हा लेकरु अंगावर पित राहील तोवर वासही घेता नाही येणार फुलांचा."
आज्जीचं आपलं काही तरीच... ती मनात पुटपूटली...
"असं काही नसतं ग आज्जी" , म्हणायचं होतं तिला, पण हातात मोगरा गोवता-गोवता विसरलीच ती... ...
परवाच वर्तमानपत्रात बातमी वाचली- ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात स्त्रियांची अरेरावी आणि परत एकदा ’ते एक वर्ष’ डोळ्यापुढून तरळून गेलं. ते एक वर्ष जेव्हा मीही पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास केला होता. ते एक वर्ष ज्यामध्ये मला कित्येक अनुभव पहिल्यांदाच मिळाले. ते एक वर्ष जेव्हा ख-या अर्थाने मी स्वत:च्या पायावर उभी राहिले आणि ते एक वर्ष जेव्हा मी एका झॉंबीसारखी जगले. ते एक वर्ष- खूप खूप वर्षांपूर्वीचं, पण अजूनही लख्ख आठवणारं आणि मधूनच ’आता मला लिहून काढ म्हणजे निचरा होईल सगळा’ असा टाहो फोडणारं ते एक वर्ष.
चार वर्षाची मुलगी आणि वर्षाचं बाळ मागे सोडून ती भरल्या संसारातून निघून गेली. गेली म्हणजे खरंच गेली, देवाघरी. घरावर दु:खाचं सावट पसरलं. पसरलं म्हणजे काय? घराला व्यापून राहिलं. कुठे जावं, काय करावं, महेशला काही सुचत नव्हतं. घरात काय चाललं आहे? मुलांचं काय? यापेक्षा तिच्याशिवाय आपण आयुष्यं कसं काढणार हाच एक विचार डोक्यात होता त्याच्या. अशी वेळ सांगून थोडीच येते आणि कुणावर आलीच तर त्याला काय होत असेल हे त्याचं त्यांनाच माहीत. कारण अशा दु:खाची कल्पना करणं शक्यही नाही आणि अशा कल्पना करूही नयेत. पण काय करणार? त्याच्यावर ती वेळ आली होती. घर लोकांनी भरलं होतं. जो तो जमेल तशी मदत करत होता.