जानेवारी संपत आला की हुरडा पार्टीचे वेध लागायला लागतात. ज्वारीची कणसं किती भरली आहेत, कोवळी आहेत बघून अंदाज घेतला जातो. साधारण फेब्रुवारीच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात हुरडा तयार होतो आणि अगदी आठवडाभरच राहतो. नंतर कणसं निबर होतात, थोडक्यात ज्वारी तयार व्हायला लागते.
गेल्या भागात आपण पाहिलं की पृथ्वीच्या थरांच्या रचनेने अगदी आजच्यासारखं नाही परंतु बऱ्यापैकी सुनिश्चित असं रूप घेतलं होतं. पहाटेचे ३ वाजले होते!
आता पुढे पाहू-
ह्यादरम्यान सततच्या हालचालींमुळे ज्वालामुखींचे उद्रेक होत असत. त्यातून वेगवेगळ्या वायूंचं मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होई. त्यात बाष्पाचं प्रमाणही लक्षणीय होतं.
नवीन लग्न होऊन ऑस्ट्रेलियात गेले तोवर भारतीय आणि भारतीय चायनीज एवढ्याच cuisines माहित होत्या. पण ऑस्ट्रेलियापासून माझी सफर चालू झाली विविध खाऊगिरीचे अनुभव घेण्याची. तिथपासून आजपर्यंत अन्नविषयक माझे विचार आमूलाग्रपणे बदलेले आहेत. माझ्या रसनेला विविध प्रकारचे पदार्थ कसे खावेत ह्याचे खूप मोठे शिक्षण मिळाले. मी खादाड आधीपासूनच होते पण आता मर्मज्ञ (कॉनोसूर) होण्याचा प्रयत्न करते आहे. ह्याचे सर्व श्रेय खरेतर माझ्या नवऱ्याचे आहे. माझ्या इतकीच किंबहुना माझ्याहून अधिक त्याला खाण्याची आवड आहे. ह्या एका खूप महत्वाच्या धाग्याने आम्ही अगदी घट्ट बांधले गेलो आहोत.
गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे. या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठे ही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं तर मनाने तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो. इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात.
मनोगत
पावसाच्या सरीला चिंब भिजायचं आहे
लाटांना सागराचा तळ गाठायचा आहे
हातांना हातचं सोडायचं आहे
स्वप्नांना गाढ झोपायचं आहे
डोळ्यांना एकमेकांना भेटायचं आहे
चंद्र किरणांना खिडकीच बंद करायची आहे
लेखणीला पानांना फाडायचं आहे
विचारांना विचार करणे बंद करायचं आहे
रात्रीला काळरात बनायचं आहे
निद्रेस कायमचं ठाण मांडायचं आहे
शहाणपणास वेडे व्हायचं आहे
भक्तीला ज्ञान व वैराग्या शिवाय जगायचं आहे
विजया केळकर ___
आधीच्या दोन भागांमध्ये आपण ह्या ग्रहाच्या जन्मापासून सजीवांच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतला. त्यातून पडणारा साहजिक प्रश्न म्हणजे हे सारं योगायोगाने घडलं असावं का ? ह्यात अनुकूल घटनाक्रमाचा मोठा वाटा असला तरीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला प्रयत्न.
कालची संध्या कानी कुजबुजली जाता जाता
सज्ज व्हा नव वर्षाच्या उषेच्या स्वागता
आम्रकुसुमांनी गंधित झाली ही हवा
साद देई प्रियेस कोकिळ हा हळवा
पहाट सुवासिक , उमलता निंबफुले
प्राशुन निंबरस , निरोगी सूर्य नभी खुले
सनईचे सूर, आनंदाचा पूर
निसर्गाचा नूर, पहा दूर दूरवर
हळदी- कुंकू सांडले नभांगणी
नि अंगणी तैसीच करु नक्षीदार मांडणी
लाल- पिवळा रंग फळे-फुले ल्याली
गंध मोगरा हुंगून अबोल झाली अबोली
पवित्र चिन्हे, गुढी-तोरणे शोभली दारी
पर्वणी ही नव्या उमेदीने करा साजरी