पॅसिफिक कोस्ट हायवे उर्फ हायवे वन उर्फ रुट वन या नावांनी ओळखला जाणारा हा रस्ता माझ्या अत्यंत अत्यंत आवडत्या रस्त्यांपैकी एक आहे. कॅलिफोर्नियाच्या सर्वात पश्चिमेला पॅसिफिक समुद्राच्या बाजूने दक्षिणोत्तर जाणारा हा मर्ग म्हणजे सौंदर्याची खाण आहे. एका बाजूला निळा-हिरवा-मोरपंखी असा अतिशय सुंदर रंगांचा समुद्र अन दुसर्या बाजूला हिरव्यागार डोंगररांगा ! मंत्रमुग्ध करुन टाकणार्या या रस्यावर कितीदा गेले तरी मन भरत नाही. फोटो मध्ये नाहीच पकडता येत त्या वातावरणातले भारावलेपण !
तर इथे टाकूया आपले लाडक्या पीसीएच चे लाडके फोटो !! :)
ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस! दरवर्षीच अजून एक वर्ष आपण एकमेकांबरोबर कसं काय घालवलं ह्या विचारानी आम्हालाच आश्चर्य वाटतं.
तर सकाळी सकाळी त्याला त्याच्या बहिणीचा का कोणाचा व्हॉटस अप आला वाटतं कारण त्याने घोषणा केली,
"१२ बरं का!"
"१२? काय १२ वाजले? एवढा वेळ झोपले मी आज?" तसा रविवार असल्याने घाई नव्हती पण १२?
एका दीडशे वर्ष जुन्या पण अजूनही ती शान तशीच राखलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या व्हरांड्यात बसून तुम्ही साग्रसंगीत चहा पित आहात. खानसाम्यानं तुमच्यासमोर आणून ठेवलीय टीकोजीनं झाकलेली किटली, नाजूक नक्षीदार कपबशा, पेस्ट्रीज आणि गरम स्नॅक्स...
भारताला अत्यंत संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या ठेव्याच्या खाणाखुणाही भारतभर अनेक रुपांत विखुरल्या आहेत. त्यातीलच एक रत्नं म्हणजे ऐतिहासिक वास्तू. गड, किल्ले, राजवाडे, वाडे , गढ्या अशा विविध स्वरुपात हा वैभवशाली गतकाळ आपल्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकारी अनास्था आणि जनतेची उदासिनता यामुळे हे अवशेष ढासळत जातात.
नुकतीच पुण्याला एक धावती भेट देण्याचा योग आला. त्या भेटीत सकाळी वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉकला गेलो होतो. काय सुरेख ठिकाण आहे ते. फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे बहुतेक, पण त्यामुळे अतिशय स्वच्छ राखली गेलेय. टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला एक गेट आणि त्यावर राखणदारही आहेत. पार्किंगकरता वर जागाही आहे. आणि मग आत जंगलात फिरण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. तुम्हाला हवी ती निवडा आणि स्वच्छंद फिरा.
शनिवार, ५ डिसेंबर २०१५ च्या सकाळची ही क्षणचित्रं :
रंगपंचमीचा दिवस होता तो. सकाळीच माईने मला ओवाळले, तिलक लावला, नंदबाबांनी गुलाल लावला गालाला आणि रंगीत करून टाकला सारा दिवस. त्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो अन सगळ्या गोपांनी घेरून टाकलं. नुसती धमाल सुरू झाली.
सगळे एकमेकांना रंगवत यमुनेतीरी आलो. तर तू अन तुझ्या सख्याही तिथे आलेलात, नेहमी प्रमाणे पाणी भरायला. पण आज तुम्हाला घाई नव्हती. तू पुढे झालीस, मला हळूच गुलाल लाऊन उलटी वळलीस. पण मी असा सोडणार नव्हतोच तुला. मीही गुलाल उधळला. सगळेच गोपही रंग उडवू लागले. लाल, निळा, गुलाबी, केशरी सारे रंग एकमेकांत रंगू लागले.
ओम जय अंबे गौरी
मैया जय शामा गौरी.
तुमको निशिदिन ध्यावत
हरि ब्रम्हा शिवजी.
सावन मधून ही आरती सिलेक्ट केली की सुरू होते एक महापूजा. मनातल्या मनातच. पहाटेच्या शांत वेळी. कामाचा धबडगा अजून सुरु व्हायचा आहे आणि कालचे घाव, मानसिक आंदोलने निद्राराणीने दूर पाठवलेली असतात. मन स्वच्छ आणि अलर्ट असते.
मानस पूजेची पहिली तयारी म्हणजे मन अतिशय साफ करणे, काम , क्रोध, मद मत्सर
आदि भाव पार काढून एखाद्या निष्पाप निरागस मुलासारखे बनणे. झोपेतून उठल्यावर
लेकराला जशी आईची आठवण पहिले येते तसे मन देवीच्या मंदिराकडे चालू लागते. काय त्या
रात्री मुलांना झोपवताना मी एक गाणं बरेचदा म्हणते - 'गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!' पूर्वी मुलांना आवडायचं गाणी ऐकणं...आता ती माझीच गरज म्हणून मी घसा साफ करून घेते. हिचं गाणं ऐकण्यापेक्षा पटकन झोपलेलं बरं...असा विचार करून ते लवकर झोपतात हा एक मोठा फायदा! असो!
आपल्याला घरकामात मदत लागते. ती करते कोण तर कामवाली बाई. ह्यांचे किती तरी प्रकार आहेत. मला काही अनुभवायला आले ते लिहीत आहे. प्रतिसादात भर घाला.
१) " मला हे हवे अन ते हवे. : : ही मदत करते पण पगारा सोबत तिला इतर काही बरेच हवे असते. घरात मदत. दागिने गहाण आहेत ते सोडवायला पैसे, गरम चहा, मुलांच्या शिक्षणाला, लग्नात आर्थिक मदत, घर बांधायला मदत सारखे जास्त पैसे मागत राहते. समटाइम्स जस्टिफाइड कधीकधी वाट्ते त्या पेक्षा तिची आपल्याला कामात मदत नको.