November 2022

वानवळा

वानवळा देणे म्हणजे आल्याकडचे पदार्थ, फळं, भाज्या हे इतरांना भेट म्हणून देणे.
एक म्हण आहे की घरच्याच चिंचेने दात आंबलेत आणि त्यात आला वानवळा.

माझ्या एका आत्याकडून आम्हाला दरवर्षी त्यांच्या बागेतल्या किमान २ पेट्या द्राक्षांचा वानवळा यायचा.
ज्या कोणाकडे हरभर्‍याची सुकलेलेई भाजी असेन तर ते देतात. नवर्‍याच्या एका मामांकडून आम्हाला डाळींब येतात.
आमच्याकडे आल्यागेल्या सर्वांना, आई आणि आजी काही बाही वानवळा देत असत.

भारतात नातेवाईकांना भेटायला गेले की चिंचा, तीळ, मोहरी, मेथी, धने, जवस, कुरड्या, पापड, पापड्या, शेवया असा बराच वानवळा आजही मिळतोच मिळतो.

Keywords: 

लेख: 

ऑरेंज मार्मलेड

साहित्यः किनो जातीची छोटी संत्री एक ग्लास किंवा मेझरिन्ग कप रस होईल इतकी. ही बारकी संत्री बरी पडतात कारण साल फार
कडवट नसते व बिया नसतात त्यामुळे मिक्सीत रस काढता येतो.

दोन संत्र्यांचा पल्प संत्री सोलुन आत ज्या चंद्रकोरी असतात त्याची पण सालेकाढायची तो हा पल्प.

एक संत्र्याची साले काढून सुरीने त्याच्या आतील पांढरा कडव ट् भाग खरवडून टाकायचा व साल पातळ राहील त्याचे लांब बारीक एक दीड इंची तुकडे करायचे.

जितका रस तितकी व्हाइट शुगर - पांढरी साखर दाणेदार. पिठी नव्हे.

पाककृती प्रकार: 

जानेमन

जाने मन - कथा - वृंदा टिळक -एकता दिवाळी अंक 2022

“ ७८६२” टॅक्सी ड्रायव्हरला सावीने कोड सांगितला. टॅक्सी सुरु झाली. सावीने फोनवरचे बोलणे पुढे सुरू केले,” अग हो आई! वेळेत घरी परत जाईन. काळजी करू नकोस. बरं चल.. ठेवते आता .. मला दुसरा फोन येतोय.”

लेख: 

रक्ताची चटक लागलेले चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.

रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत...

रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.

रुपाली..श्रद्धा.. आणि
उजेडात न आलेली सावजं किती तरी
आईवडिलांशी भांडून घर सोडलेल्या, पळून गेलेल्या किती तरी
इतक्या भाळल्या? कशाला भुलल्या?
जिवावर अशा कशा उदार झाल्या?

रक्ताची चटक लागलेले
चाकू सुरे खुले आम हिंडत आहेत.
तरुण मुलींचे मन, कातडी, मांस, रक्त
पाहून लालचावत आहेत.

कविता: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग १

फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.

ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.

Keywords: 

लेख: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग २

कधी जायचं भारतात यासाठी सृजन रोज Countdown करत होता, त्यालाही खूप दिवसांनी विमानात बसायला मिळणार होतं. आईची जय्यत तयारी चालू होती. तुम्ही आले की हे करायचं, ते करायचं याच्या याद्या वाढत होत्या. त्या आधीपासून बाबा म्हणत होते की घराला रंग देऊ, आई म्हणत होती आता कशाला? नको एवढ्यात. पण मग मी येणार हे ठरल्यावर बाबा जिंकले आणि रंगाचे काम झाले, त्यामुळे घर पण सगळं सजून धजून होतं. मधल्या काळात घरात नवीन सोफा आला, गार्डन मधल्या फरश्या बदलल्या, नवीन पडदे लागले असे बरेच बदल होते. घरातलं आंब्याचा झाड वाढलं आहे, त्याला कैऱ्या आल्यात त्या बघायच्या होत्या. शक्य त्या सगळ्यांना भेटायचं होतं.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग ३

एक तारीख आली की लगेच आई बाबा सगळ्या कामवाल्या बायकांचे पैसे काढून ठेवतात, कुणालाही पगारासाठी वाट बघावी लागू नये, वेळच्या वेळी दिलेच गेले पाहिजेत ही शिस्त. मी आले म्हणून एक कामवाली खास दोन वेळा येते, त्याचे जास्तीचे पैसे पण देतात. या सगळ्या जणी आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत. पोळ्यावाली रीता म्हणजे आईची मानसकन्याच. एक दिवस तिनी आम्हाला आग्रहाने जेवायला बोलावलं होतं. मी सृजन आणि आई गेलो. तिनी अत्यंत चविष्ट अश्या कचोर्‍या, चाट आणि शिवाय सृजनला आवडतात म्हणून रंगीत पापड कुरड्या असा बेत केला होता. आग्रह करून ती वाढत होती. सृजनला तिच्या घराच्या गच्चीत फार आवडलं. म्हणून तो मला घेऊन गेला.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

भारतवारी मे-जून २०२२ - भाग ४

भाग ३

इकडून जाताना कुणासाठी काय न्यायचं याची एक यादी असते. एक यादी असते भारतात आईला करायला सांगायचे पदार्थ, बँकेची किंवा काही कागदपत्रांची कामं असतील तर ती एक यादी, एक शॉपिंगची यादी, ज्यात इकडे येताना आणायचं सामान, कपडे, भांडी असं काय काय असतं. मग गेल्यावर याद्या एकेक करत टिक मार्क होत जातात.

Keywords: 

लेख: 

आठवते ना, आठवते ना! - ज्ञान प्रबोधिनीची तोंडओळख, इयत्ता पाचवी ते सातवी

२०१५- २०१६ हे वर्ष ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक आदरणीय वि. वि. पेंडसे (आप्पा पेंडसे) यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आप्पांनी सुरु केलेल्या ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मी माजी विद्यार्थिनी. ह्या विशेष स्मृती वर्षात आपल्याला काय करता येईल असा विचार करताना प्रशालेतील पाचवी ते दहावी मधल्या वर्षांच्या आठवणी लिहून काढाव्यात अशी कल्पना मनात आली. दरम्यान मायबोलीवर शाळेच्या आठवणींचा एक धागा सुरु झाला आणि आठवणी लिहून काढायला निमित्त मिळाले! तिथे लिहिलेल्या आठवणी एकत्रित स्वरुपात राहाव्यात म्हणून इथे प्रसिद्ध करत आहे.

लेख: 

आठवते ना, आठवते ना! - इयत्ता आठवी

आठवीत चारुता ताई आमच्या वर्ग शिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर आम्ही वर्षभर एक वेगळा उपक्रम राबवला! महिन्यातले एकाआड एक शनिवार वर्गातल्या चौघी जणी दुपारची शाळा सुटल्यावर ताईंबरोबर त्यांच्या घरी जायचो. तिथे अख्खी दुपार घालवायची आणि मग संध्याकाळी घरी परत जायचं! ह्या दुपारच्या वेळात आम्ही काहीतरी कलाकारी करायचो आणि शिवाय एखादी कमी कटकटीची पाककृती बनवायचो. ह्याशिवाय ताईंशी आणि त्यांच्या घरच्यांशी अखंड गप्पा असायच्याच! अशाप्रकारे आम्ही सगळ्या जणी त्या एका वर्षात ताईंच्या घरी जाऊन आलो. हा खरंच खूप छान उपक्रम होता. आता वाटतं की ताईंनी केवढी मोठी commitment केली होती आमच्यासाठी!

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle