भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.
नमस्कार,
ई प्रतिष्ठान तर्फे "जंगलसफारी - बांधवगड" हे मी लिहिलेलं ईपुस्तक आज प्रकाशित होत आहे.
आज दुपारी माझ्या आईच्या हस्ते या ई पुस्तकाचे प्रकाशन एका कौटुंबिक कार्यक्रमात करीत आहे.
ई पुस्तक प्रकाशित करण्याचा हा अनुभव खूप छान होता. सुनिल सामंत, सचिन काकडे यांनी अतिशय सुंदर पुस्तक तयार केले. त्यांचे आणि ईसाहित्य प्रतिष्ठानचे मन:पूर्वक आभार.
११ तारखेला सकाळी मेट्रोनं डाऊनटाऊनमधल्या 7th Street / Metro Centre Station ला उतरलो आणि स्टेशनबाहेरूनच अनाहिमला जाणारी बस पकडली. या बसनं आम्हाला प्रचंड फिरवलं फिरवलं आणि एकदाचं डिस्नीच्या हॉटेलात आणून सोडलं. अर्धादिवस गेला होता. पण उरलेला दिवस घालवला आम्ही डिस्नीलँड पार्कात.
आम्ही इतक्या दिवसांकरता अमेरीकेला जाणार म्हटल्यावरच बहिणींनी बोटावर बोटं ठेवायला सुरूवात केली. त्याचं कारण आमचं ट्रॅक रेकॉर्ड खरंच खराब होतं. कोणत्याही ठिकाणी १० दिवसांकरता जरी गेलो तरी ५-६ दिवसांत आम्हाला घरची आठवण येऊ लागते. कधीकधी तर ट्रिप प्रीपोन करून घरी आलोय. त्यामुळे त्यांचंही काही चुकलं नव्हतंच.
फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.
कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?
समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?