परवा ६/६ म्हणजे ६ जून हा जागतिक इकेबाना दिवस आहे. म्हणून या दिवसाचं औचित्य साधून इथे हा लेख आणत्ये. माझ्या अंगात अजिबात कलाकुसर नाही. त्यामुळे माझ्या फोटोग्राफीच्या “कौशल्या”कडे दुर्लक्ष करा :) बरेचसे फोटो खूप जुने आहेत.
सत्यमेव जयते ही सिरिज साधारण २०१२ मध्ये प्रसारीत व्हायला सुरवात झाली. त्यात काही भाग शेतीसंबंधी होते. त्यात एक होता महाराष्ट्राच्या काही दुष्काळग्रस्त जिल्ह्यातली पाणीटंचाई आणि एक होता पिकांवरील किटकनाशकांमुळे शेतकर्यांमध्ये वाढलेले कर्करोगाचे प्रमाण.
कार्यक्रमाचा निर्माता आमिर खान याची या निमित्ताने शेतीविषयक प्रश्नांशी ओळख झाली.
१९६५ मध्ये सलग दोन वर्षे देशात पडलेल्या भयंकर दुष्काळाने भारतातील जनतेवर उपासमारीची वेळ आणली. अन्नधान्य आयात करुन लोकांचा जीव जगवणे सरकारला भाग पडले.
परत अशी वेळ देशावर येऊ नये म्हणुन हरित क्रांती जन्माला आली. त्याखाली जास्त उत्पन्न देणारी संकरीत बियाणे भारतात झपाट्याने विकसित झाली व प्रसारीत झाली. त्याआधीची प्रचलीत पारंपारिक बियाणे मर्यादित उत्पन्न देत होती.
उत्तरेकडच्या सगळ्या धाब्यांवर भाज्या पंजाबी, हरयाणवी असो की राजस्थानी, ट्रान्सपोर्टवाले पब्लिक ताव मारून खाते ते सिरकावाले प्याज! कांदे व्हिनिगरमध्ये मुरलेले असल्यामुळे कितीही खाल्ले तरी तोंडाला कच्च्या कांद्यासारखा वास येत नाही म्हणून हे जास्त प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत सगळ्या रिल्समध्ये साधीच रेसीपी बघितली होती पण सर्च करताना सगळीकडे 'जैसलमेर की रेस्टॉरंट जैसी स्पेशल ' असा टॅग लावलेला दिसला. मग तसेच शोधून करून टाकले बाबा सिरकावाले प्याज!
माझ्या आईने तिच्या बालपणापासूनच्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि त्या इथे सगळ्यांसोबत शेअर करायला मला परवानगी दिली आहे. भाग एक टाकला आहे. मैत्रिणींना वाचायला आवडल्या तर पुढचे भाग टाकेन.
युरोप मध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहात ९५ टक्के वेळा स्वच्छता असते. स्वित्झर्लंड मध्ये तर सुबक सजवलेली अनेक टॉयलेट्स पाहिली होती. मग इथे आता काय वेगळं असेल? मी फोटो पाहिले नव्हते, फक्त गुगल वर याबद्दल वाचलं होतं.
तिथे पोचल्यावर बाहेरून तसे नेहमी सारखेच वाटले. आत टॉयलेट पेपर, hand wash, गरम पाणी, हात पुसायला कागद हेही होतं. आणि एका भिंतीला पूर्ण काचेची खिडकी होती, ज्यातून पलिकडे वाहणारी नदी दिसत होती. And even before I realized I went back to औरंगाबाद एसटी स्टँड.
मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. तेव्हा आम्हाला शाळेने कराड मधील मुतालिक वाडा आहे तिथे नेले होते. तिथे एक जण आम्हाला मुलांना गोष्ट सांगत होते.,'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'. तर ते गृहस्थ मला खूप आवडले. त्यानंतर ते एक दिवस चाळीतील कुणाकडे तरी आले होते, मी त्यांना कुठे पाहिले हे विसरून गेले होते. मी तिथेच खेळत होते. त्या ग्रस्तांना पाहिल्यावर का कुणास ठाऊक मला वाटले की हे माझ्या दादांचे मित्र आहेत. त्यामुळे मी दोन-तीनदा त्यांना म्हणाले की माझे दादा घरी आहेत. त्यांनाही वाटले कोण हिचा दादा आहे बघूया. मला म्हणाले चल तुझ्या दादांकडे.
माझे दादा कुठेही बाहेर निघाले की मला बरोबर घेऊन जात. सगळ्यांना सांगत हे आमचे शेंडेफळ म्हणून. माझ्या इतका त्यांचा सहवास माझ्या कोणत्याच भावंडांना मिळाला नाही. कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा माझे दादा 1942 च्या लढ्यात उतरले होते. त्यामुळे सतत त्या कामात आणि जेलमध्ये असायचे. मला वाटते दादांची पण मुलांबरोबर राहायची हौस राहिली असेल त्यामुळे ते माझे खूप लाड करत, असे आता मला वाटते. विशेष म्हणजे माझ्या कोणत्याच भावंडांनी त्याबाबत माझा राग राग केला नाही. उलट त्यांनीही माझे लाडच केले. मला वाटते ते सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे असेल.
मटकीची डाळ आणली होती आमट्यांचे व्हेरिएशन व्हावे म्हणून.
एका प्रदर्शनात मस्त कांदा लसूण मसाला मिळाला. तो एका सुंदर ऑलिव्स च्या बाटलीत काढून ठेवलाय. त्यामुळे तो ड्रॉवर उघडला की दिसतो आणि सारखा वापर करू वाटतो.
परवा मटकीची डाळ दिसली आणि अचानक झणझणीत सोलापुरी डाळ कांद्याची आठवण झाली.
मग काय केला लगेच.