ऐल पैल

ail_pail_cover.jpeg

भेट होणं किती गरजेचं असतं! लांब राहून विचार स्वच्छ राहात असतील, विचार करायला वेळ मिळत असेल पण नुसतंच विचारांमध्ये किती दिवस एखाद्याला जिवंत ठेवायचं.. आज जर अशी अचानक भेट झाली नसती तर मी स्वतःहून त्याला भेटायचं ठरवलं असतं...? तो म्हणाला असता तर मी गेले असते की पुन्हा तू घाई करतोयस म्हणाले असते...? एवढे दिवस संपर्क तोडून मी काय तीर मारला होता..? पायलशी भेट होइपर्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकले असते का मी..? आणि ती भेटलीच नसती तर हे चक्र असंच सुरू राहीलं असतं... त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी सोडून फक्त त्याची एक अर्धवट चूकच लक्षात ठेवून हळूहळू त्याच्यापासून दूर जात राहिले असते... शेवटी मलाच काही फरक पडला नसता... त्याच्याबद्दल जे नकारात्मक मत बनवून घेतलं होतं, पुढे जाऊन स्वतःला त्याला सोडून दिल्याचं तेच कारण सांगितलं असतं आणि तेच खरं मानत आले असते... आणि त्याचं काय? तो कसलीच तक्रार न करता कधीतरी माझा निर्णय होईल या भरवशावर थांबून आहे...पुढे फक्त त्याची सवय मोडली म्हणून त्याला मी नाही म्हणून सांगितलं असतं तर त्याला काय वाटलं असतं..?
तिने एक मोठा श्वास घेतला.
भेट झाली ते चांगलंच झालं... इतके दिवस रुटीन आपलंसं करत न संपणाऱ्या चक्रात अडकून बसले होते, त्यालाही अडकून ठेवलं होतं... त्याला आज भेटून मला परत कळून चुकलंय की मला तो किती हवा आहे..!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle