वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.
परवा, म्हणजे १३ फेब्रुवारीला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. आधीच पुस्तक म्हटलं की माझ्या आवडीचा विषय, त्यात ‘पुस्तकाचा विषय’ तर अति आवडीचा. बरोब्बर, मिलिंद सोमण!
काळाच्या एका टप्यावर निसर्गाने मानवामधे दोन मोठे बदल केले. आणि मानव इतर प्राण्यांहून वेगळा बनू लागला. एका बद्दल नेहमीच बोललं गेलं. दुसऱ्याचा मात्र अभावानेच उल्लेख झाला.
१. मानवाच्या मेंदूचा विकास झाला, त्याचे आकारमान वाढले. पर्यायाने त्याची बुद्धिमत्ता वाढली.
आणि
२. स्त्रीच्या प्रजनन काळाची सिमितता संपली. म्हणजेच विशिष्ठ काळातच तिची प्रजनन क्षमता असेल असे न रहाता ती कधीही प्रजनन करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली.
या दोन्ही बदलांमुळे एका अर्थाने मानवी समुदाय, समाज निर्माण झाला असे म्हणावे लागेल.
आकाशात चंद्र उगवला होता. जरासे थंडच होते वातावरण. अनु सैरावैरा धावतच होता. तो थेट सूटबूट काकांच्या घरासमोर आला आणि त्याच्या पायालगतचे काल्पनिक ब्रेक दाबल्यासारखं करून तो थांबला.
त्यानं हळूच कानोसा घेतला. बाहेर कुणीच नव्हतं. आतून संथ स्वरातली धुन ऐकायला येत होती. तो आत जायचं की नाही या संभ्रमात असतांनाच त्याला काही आवाज ऐकायला आले. कुणीतरी बोलत होतं. पण नक्की काय ते कळत नव्हतं. मग दुसरा आवाज कानी पडला. तो ऐकताच अनु झटकन गेटच्या बाजूला झाला आणि भिंतीशी लपला.
"सुमाताई! "
नीलू अनुला सायकलवर घेऊन आली होती. तिला पाहून सुमाला आश्चर्य वाटले.
"अगं बाई, तुला सोडायला लावलं होय यानी. काय रे अनु?"
अनुने सायकल वरून खाली उडी मारली. काही कळायच्या आत हातात काहीतरी सावरत 'काकुआज्जी!' असं म्हणत समोर पळाला. सुमा आणि नीलू 'अरे सावकाश..' असं म्हणतच राहिल्या.
"अनु, बाळा, जा बरं पोलीसताई कडे हा गजरा नेऊन दे बरं. विसरली वाटतं नीलू. तसंच पेरू काढून ठेवलेत. ते त्या पलिकडच्या गल्लीत राहतात ना वकीलीणबाई, त्यांना दे. पाहुणे येणारेत त्यांच्या कडे. नेशील ना व्यवस्थित? ", सुमाने विचारलं.
"होssss"
असे ओरडून पिशवी सावरत रस्त्याला लागला अनु. नेहमी प्रमाणे घराबाहेर पडताच एखादा दगड हुडकून तो ठोकारत ठोकारत चालला होता तो.
मुग्धा ओट्यावर हताश होऊन बसली होती. प्यायचं पाणी आलं होतं नळाला. सर्वांना पाणी मिळावं या उद्देशाने शोभाताईंनी नळाचं connection आतवर करून घेतले नव्हते. इतर वेळी सर्व बोअरचं पाणी वापरत. नळाला पाणी आलं की ते भरून झाल्यावर शोभाताईंना एक दोन हंडे-कळशी भरून देत.
शोभाताई बाहेर गेल्यामुळे मुग्धा पाणी भरायला बाहेर आली. ओट्याच्या पायर्यांजवळच खाली नळ होता. तिने कळशी भरायला ठेवली. पण ती काही भरेचना!
कळशी भरली की भिर्रकन अनुची स्वारी तिथं प्रकट व्हायची आणि 'दिदी तेरा देवर दिवाना' - या गजरात ती पालथी करायची! किती नको म्हटलं तरी अनु कुठे ऐकणार होता?
आतून अनुला आईबाबांचं बोलणे ऐकायला येत होते.
"कुठे उधळलेत चिरंजीव? आज तरी शाळेत जाणार का?"
"राहू द्या हो. चिंगी नाहीये ना इथे. म्हणून भिरभिरलाय जरा."
'कशी गोड माझी सुमाक्का!'
"एखादं छानसं भजन म्हण ना मुग्धा", वाती तुपात बुडवत शोभाताई म्हणाल्या.
"कुठलं म्हणु?"
"कुठलंही म्हण अगं ", अनुला जवळ घेऊन कुरवाळत शोभाताई म्हणाल्या.
"किती वेळ लावशील? मी असतो तर आतापर्यंत म्हणून देखील झालं असतं आणि प्रसाद देखील खाऊन झाला असता..देवाचा", अनुची बडबडीकडे दुर्लक्ष करून मुग्धाने गायला सुरवात केली.
"तुझी पदकमले मज शतकोटी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी
तुझ्या पद-धुळीची आस देवा
नित्य नव्याने घडू दे सेवा
राहू दे तुझे आशिष पाठी
सोडवी जन्ममरणाच्या गाठी
तुझी पदकमले मज शतकोटी||"